संकरीत तूरीखाली महाराष्ट्रात तसेच देशात एकुण क्षेत्र फारच नगण्य आहे. याचे कारण म्हणजे संकरित तूर वाणाचे बियाणे पुरेशा प्रमानात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बंधुंनी आपले गरजेपुरते संकरित बियाणे पुरेशा आपल्याच शेतात थोड्या फार क्षेत्रात (५ त् १० गुंठ) तयार केल्यास फायद्याचे होऊ शकते.
तूरीचे संकरित बीयाणे मादी आणि नर वाणाचा नैसर्गिकरितिने संकर घडवुन तयार करता येते. ज्वारी, बाजरी व सूर्यफुल मधील संकरित वाणाची मादी सायटोप्साझमीन नर नपुंसकता (सी.जी.एम.एस.) तत्त्वाचा उपयोग करुन तयार करतात तर तुरीमध्ये वर दिलेल्या संकरीत वामासाी जेनेटीक नरनपुंसकता (जी एम.एस.) तत्वाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे तुरीचे बियोत्पादन तंत्रामध्ये ज्वारी, बाजरी किंवा सुर्यफुलापेक्षा थोडा वेगळेपणा आहे. संकरित तुरीच्या बियोत्पादन कार्यक्रमामधील मादी वाणामध्ये ५० टक्के झाडे नरनपुंसक तर बाकी ५० टक्के फलमक्षम झाडे उपटुन टाकावी लागतात. मादी वाणातील फक्त नरनपुंसक झाडांपासक संकरित तूर बिजोत्पादन होते.
संकरित तूरीच्या अधिक बिजोत्पादनाकरिता डॉ.पं.दे.कृ.वि च्या खडधान्य संशोधन विभाग अकोलाद्वारे बिजोत्पादन तंत्रज्ञान विकसीत केले आहे. थोडक्यात ते देण्याचा प्रयत्न केला आहे.
बिजोत्पादन लागवड तंत्रः
विलगीकरण अंतरः
बिजोत्पादन क्षेत्राचे चारही बाजुंनी ४०० मिटर विलयांतर ठेवावे. या परिसरात दुसरे तुरीचे पीक असतात कामा नये.
रासायनिक खतेः
पेरणापुर्वी हेक्टरी २५ किलो नत्र अधिक ५० किलो स्फुरद रासायनिक खताद्वारे द्यावा. नत्राची मात्री अमोनीयम सल्फेट व स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेट मदुन द्यावी. कारण ही खते दिल्याने नत्र व स्फुरद व्यतिरिक्त गंधक व कॅलशीयम पिकास मिळतो. जमिनीतील सुक्ष्म अन्नद्रव्याचे परीक्षन करुन आवश्यकता असल्यास प्रति हेक्टरी १० किलो गंधक आणि किंवा ५ ते १० किलो जस्ताची मात्रा द्यावी.
बियाणेः ३ ते ४ किलो मादी- १ ते २ किलो नर प्रती हेक्टर.
पेरणीची चैफुलीवर शुधारीत पदधतः
संकरित बिजोत्पादन क्षेत्राची पेरणी शक्यतो चौफुली पद्धतीने करावी आणि त्यासाठी दोन ओळीतील (९० त् १२० सें.मि) आणि दोन चैफुलीतील अंतर (६० सें.मि.) नेहमिच्या व्यापारी पीका करीता (तूर) वापरावयाच्या अंतरापेक्षा जास्त असावे. तसेच प्रत्येक चौफुलीवर मध्यभागी चांगले कुजलेले शेणखत (अंदाजे १०० ते १५० ग्रॅम-फुली) टाकावे किंवा उताराच्या विरुद्ध दिशेणे डव-याणे स-या ओढतांना रस्त्याद्वारे पेरावे. प्रत्येक चौफुलीवर मादीवाणाच्या चार बिया चैकोणी पद्धतीने चार ठिकाणी एकमेकापासुन साधारण २० ते ३० सें.मि अंतरावर लावाव्यात तर नर वाणाच्या २ ते ३ बीया लावाव्या.
बियाण्याची लागवड केल्यानंतर सरीमधुन पाणि सोडावे. त्यामुळे बीयाण्याची उगवण एकाट वेळी व चांगली होईल. व जनक वाणाच्या झाडाची वाढ सारखी मिळेल मादी आणि नर वाणाचे ओळीचे प्रमाण ४.१ किंवा ६.१ असे ठेवुन अशा क्षेत्राचे सभोवताल ४ ते ६ ओळी नर वाणाच्या पेराव्यात (आ.क्र.६) नर वाणाच्या ओळी ओळखण्याकरीता त्यात सुरवातीला मध्ये व शेवटी बुरु मका किंवा सुर्यफूलाचे बि लावावे. बिजोत्पादन क्षेत्राची लागवड जुन अखेर ते १० जुलै पर्यंत करावी.
पेरणीची जोड ओळ पद्धतीः
चैफुलीच्या पेरणात टोकन पद्धतीने पेरणा अवघड वाटस असल्यास आकृती क्र ४ मध्ये दाखवील्या प्रमाने जोड ओळ पद्धतीत टोकम पद्धतीने पेरणा करता येऊ शकेल.
सरळ ओळीची पेरणी सुद्धा करता येईल ,सरळ ओळ किंवा जोड ओळीची पेरणी टोकण पद्धतीने किंवा त्याच्या सहाय्याने केली तरी चालेल परंतु एकाच ठिकाणी एक पेक्षा जास्त बिया पेरल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी. उगवण फाल्यावर ७-८ दिवसाचे आंतरवीरळणी करुन १० ते २० स्.मी वर १ जाड राहील याची खात्री करुन घ्यावी.
आंतरमशागतः
तुरीचे पीक सुरवातीला अतीशय सावकाश वाढते तुरीच्या पीकाची वीरलणी बी उगवल्यानंतर साधारणपणे १० ते १५ दिवसांणी करावी. वीरळणी करतांना एका ठीकाणी एक कींवा दोन रोपे ठेवावी पहीली कोळपमी २५ ते ३० दिवसांणी करावी या नंतर २० ते २५ दिवसांच्या अंतराणे २ ते ३ कोळपण्या कराव्यात. त्याचप्रमाणे तीरीच्या पीकाला कमितकमि दोन वेळा निमणी करण्याची आवश्यकता आहे.तण नियंत्रणाचे दृष्टीणे तीरीचे पीक पेरणीपासुन सुमारे ६० ते ९० दिवसापर्यंत तण मुक्त ठेवणे आवश्यक आहे.
लागवड तंत्र
जमिन:
पाणथळ जमीन या पिकाच्या वाढीकरीता अतीशय संवेदनशील असल्यामुळे पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन या पिकाकरीता निवडावी. ६०० ते ९०० मि.मी. पावसाचे वितरण समप्रमाणात झाल्यास या पिकाची वाढ जोमाने होऊन उत्पादन चांगले होते. पिकाच्या प्रथमावस्थेत म्हणजे सुरवातीच्या दोन महीण्यात पाऊस चांगला झाल्यास पुढे पूक फुलो-यावरच्या कालावधीत तुरळक पावसाच्या सरी येऊन उघाङ पडल्यास या पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन मिळते.
१८ ते २९ अंश से. उष्णतामानात या पिकाची वाढ चांगली होते. सुमारे ३५ अंश से. पर्यंत उष्णतापमाण हे पीक सहन करु शकते. प्रखर सूर्यप्रकाशात या पिकाचे जास्तात जास्त उत्पादन मिळते. ढगाळ हवामानात मात्र पिकाची वाढ खुंटुन त्याचा उत्पादनावर विपरीत परीणाम होत. ६.० ते ८.५ चे दरम्यान आम्ल-विम्ल निर्देशांक असलेल्या मध्यम ते भारी काळ्या जमिनीत हे पिक चांगले येऊ शकते. सन २००४-०५ साली महाराष्ट्रात तूरीचे क्षेत्र सुमारे १०.७४ लाख हेक्टर असुन त्यातुन ६.५८ लाख डन उत्पादन होते. विदर्भात तूरीची लागवड ५.२३ लाख हेक्टरावर होते आणि ३.४४ लाख डन उत्पादन होते. सध्या लागवडीखालील बहुतेक वाण मध्यमते उशीरा कालावधीचे आहेत आणि सुमारे ९० टक्के पेक्षा जास्त क्षेत्र अशा वाणाखाली येते. मागील काही वर्षाच्या संशोधनाद्वारे हळव्या (लवकर तयार होणा-या) तसेच निमगरव्या (मध्यम उशीरा) सुधारीत वाणांचा विकास झाला आहे.